अकरावी प्रवेशावेळी दहावीचे गुणपत्रक-शाळा सोडल्याचा दाखला तत्काळ सादर करण्याची सक्ती न करण्याचे निर्देश

अकरावी प्रवेशावेळी दहावीचे गुणपत्रक-शाळा सोडल्याचा दाखला तत्काळ सादर करण्याची सक्ती न करण्याचे निर्देश

अकरावी प्रवेशावेळी दहावीचे गुणपत्रक-शाळा सोडल्याचा दाखला तत्काळ सादर करण्याची सक्ती न करण्याचे निर्देश

पुणे, ता. १ - दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना अद्याप मूळ गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला प्राप्त झालेला नसल्याने अकरावी प्रवेश प्रक्रियेत कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी प्रवेश निश्चित करताना ही कागदपत्रे तात्काळ सादर करण्याची सक्ती न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत सहभागी विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या निर्देशानुसार विभागाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

याबाबत शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) यांनी सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) आणि कनिष्ठ महाविद्यालयांना सूचना जारी केल्या आहेत. सन २०२६-२७ च्या अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत नियमित फेरी क्रमांक १ सुरु असून २९ मे २०२६ रोजी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे.

ज्या विद्यार्थ्यांना संबंधित कागदपत्रे अद्याप प्राप्त झालेली नाहीत, त्यांच्याकडून गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला उपलब्ध होताच सादर करण्यात येईल, असे हमीपत्र घेऊन प्रवेश निश्चित करता येणार आहे. आधार व्हेरिफाइड विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका डिजीलॉकर मध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. गुणपत्रक आणि शाळा सोडल्याचा दाखला निर्धारित कालावधीत सादर न केल्यास संबंधित विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द करण्यात येऊ शकतो, याची जाणीव विद्यार्थी व पालकांना करून देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories