विधानपरिषदेच्या ९ रिक्त होणाऱ्या जागांसाठी '१२'मे ला निवडणूक
पुणे, ता. १६ - महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ९ आमदारांचा कार्यकाळ १३ मे २०२६ रोजी संपत आहे. या रिक्त जागांसाठी निवडणूक आयोगाकडून निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. या निवडणूकीसाठी १२ मे २०२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी चार वाजेपर्यंत मतदान होणार आहे. मतमोजणी त्याच दिवशी होणार आहे.
विधान परिषदेचा एक आमदार निवडून येण्यासाठी २८ मतांची गरज असते. सध्या महायुतीत भाजपकडे सर्वाधिक १३१ आमदार आहेत. त्याखालोखाल शिंदेंच्या शिवसेनेकडे ५७ आमदार तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडे ४० आमदार आहेत.
यांचा कार्यकाळ संपणार -
शिवसेना -ठाकरे गट - उद्धव ठाकरे
शिवसेना - नीलम गोहे
राष्ट्रवादी शरद पवार गट - शशिकांत शिंदे
राष्ट्रवादी अजित पवार गट - अमोल मिटकरी,
काँग्रेस - राजेश राठोड,
भाजप - प्रवीण दटके, रमेश कराड, गोपीचंद पडळकर, रणजितसिंह मोहिते-पाटी