माळशेज घाटमार्गे मुंबईकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक पुर्णपणे बंद - जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

माळशेज घाटमार्गे मुंबईकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक पुर्णपणे बंद - जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

माळशेज घाटमार्गे मुंबईकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक पुर्णपणे बंद - जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन

पिंपरी, ता. २७ जुलै २०२६ - कल्याण-माळशेज घाट राष्ट्रीय महामार्ग क्र. ६१ मौजे करंजाळे गावाच्या ठिकाणी रस्ता खचल्यामुळे माळशेजघाट मार्गे अहिल्यानगर तसेच पुणे येथून मुंबईकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक पुर्णपणे बंद करण्यात आली आहे.

वाहतूक नियमन व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये याकरिता वाहतूक बंद करण्यात आली आहे. आळेफाटा-नारायणगाव-खेड-चाकण-तळेगाव (एमआयडीसी)-लोणावळा खोपोली-मुंबई या पर्यायी मार्गाने वळविण्यात आली असल्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आदेश जारी केले आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories