पाणी जपून वापरा, महापालिकेचे नागरीकांना आवाहन
पिंपरी, ता. ७ - शहरात अनेक ठिकाणी पाणी टंचाईची समस्या आहे, पाणी प्रश्न सोडवण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. प्रशासनाला साथ देत नागरीकांनीही पाणी जपून वापरावे, असे आवाहन महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने सोशल मिडीयाद्वारे केले आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब अमूल्य आहे, आजची बचत म्हणजे उद्याची सुरक्षितता, पाणी जपून वापरा, भविष्य वाचवा....असा संदेश पाणी पुरवठा विभागाने दिला आहे.
