राज्यातील तीर्थक्षेत्रे, गड-किल्ले आणि ऐतिहासिक वारशाच्या विकासासाठी तब्बल रुपये ९९३ कोटींचा निधी मंजूर
राज्यातील तीर्थक्षेत्रे, गड-किल्ले आणि ऐतिहासिक वारशाच्या विकासासाठी तब्बल रुपये ९९३ कोटींचा निधी मंजूर
पुणे, ता. २० - राज्यातील ऐतिहासिक व धार्मिक स्थळांच्या जतन-संवर्धनासाठी शिखर समिती बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. राज्यातील तीर्थक्षेत्रे, गड-किल्ले आणि ऐतिहासिक वारशाच्या विकासासाठी तब्बल रुपये ९९३ कोटींच्या निधीस मंजुरी देण्यात आली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. राज्यातील तीर्थक्षेत्रे, गड-किल्ले आणि ऐतिहासिक ठिकाणांवर भाविक आणि पर्यटकांसाठी अत्याधुनिक सुविधा, आरोग्य सेवा आणि शाश्वत विकासावर भर देण्यात येणार आहे. महाराणी ताराराणी, महाराणी येसूबाई आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधिस्थळांचाही जीर्णोद्धार व परिसर विकास होणार आहे. महाराष्ट्राचा ऐतिहासिक आणि आध्यात्मिक वारसा अधिक भव्य, सुशोभित आणि जागतिक दर्जाचा करण्याच्या दिशेने मोठे पाऊल मानले जात आहे.
निधीची तरतूद अशी ....
🔸 श्रीक्षेत्र भीमाशंकर विकास – रु. १७२.२२ कोटी
🔸 संत तुकाराम महाराज जन्मस्थान संवर्धन – रु. ४१.७१ कोटी
🔸 संगम माहुली समाधिस्थळ संवर्धन – रु. १३३ कोटी
🔸 घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग विकास – रु. २१०.४५ कोटी
🔸 परळी वैजनाथ विकास आराखडा – रु. ३०१.५४ कोटी
🔸 अजिंक्यतारा किल्ला संवर्धन – रु. १३४.८० कोटी