दिल्लीमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीकडून 'महाराष्ट्र बंद'ची घोषणा

दिल्लीमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीकडून 'महाराष्ट्र बंद'ची घोषणा

दिल्लीमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीकडून 'महाराष्ट्र बंद'ची घोषणा

पिंपरी, ता. २२ जुलै २०२६ - शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार व नीट परीक्षा पेपरफुटीप्रकरणी दिल्लीमध्ये सुरु असलेल्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर लाठीमार करण्यात आला. या प्रकाराचा निषेध करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनास पाठिंबा दर्शवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी २३ जुलै रोजी 'महाराष्ट्र बंद'ची घोषणा केली आहे.

 सर्व समविचारी पक्ष, विद्यार्थी, सामाजिक संघटना आणि नागरिकांनी या बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. याबाबत, प्रकाश आंबेडकर यांनी निवेदन प्रसिद्ध केले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, दिल्लीतील जंतर-मंतर आणि संसद परिसरात शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेली कारवाई ही लोकशाहीला न शोभणारी आहे. अशा दडपशाहीविरोधात आवाज उठवण्यासाठी महाराष्ट्र बंदची घोषणा करण्यात आली आहे.

'महाराष्ट्र बंद'ला पाठिंबा द्यावा.....

''दिल्लीत शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष हल्ल्याच्या आणि लाठीचार्जच्या पार्श्वभूमीवर, त्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आणि पोलिसांच्या या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी 'वंचित बहुजन आघाडी'ने २३ जुलै रोजी 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिली आहे. मी सर्व समविचारी पक्ष, विद्यार्थी आणि समाजातील सर्व स्तरांतील नागरिकांना आवाहन करतो की, त्यांनी एकत्र येऊन २३ जुलैच्या 'महाराष्ट्र बंद'ला पाठिंबा द्यावा.'' - प्रकाश आंबेडकर 


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories